Marathi Biodata Maker

पुण्यात जोरदार पाऊस, परतीचा पाऊस नाही हे आहे त्याचे कारण

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (15:11 IST)
राज्यभर परतीच्या पावसाचं जोरदार हजेरी लावली आहे. आधी  मुंबईत रात्री तासभर जोरदार पाऊस झाला. तर दुसरीकडे पुण्यात ऐन पावसाळ्याप्रमाणे रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचले आहे. पुण्यातील बी टी कवडे रोडवर तारादत्त कॉलनीत पावसाचं पाणी तुंबलं असून त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे. या रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने घरात इतकं पाणी साचलं की एखादा ओढा वाहतोय की असे चित्र दिसत होते. घरात पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू पाण्यात तरंगत होत्या. दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या आहे. 
 
मात्र पडणारा पाऊस हा परतीचा नसून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस आला असून, असं हवामान तज्ञ शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले आहे.  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने, महाराष्ट्रात वीजांचा कडकडाट करत संध्याकाळी पाऊस होतो आहे. तर कमी दाबाचा पट्टा काही दिवस तसाच राहणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत पाऊस मेघगर्जनेसह होईल, मग या महिन्याच्या अखेर पाऊस कमी होईल, असं शुभांगी भुते यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

MSRTC Vacancy एसटी महामंडळात १७,७४२ पदांची महाभरती: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

Hardik Pandya flag controversy गर्लफ्रेंडसोबतच्या व्हिडिओमुळे वाद, पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

LIVE: महाराष्ट्र विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी

कुंभमेळा फेम मोनालिसाने केरळमध्ये बॉयफ्रेंड फरहान खानशी लग्न केले; 'लव्ह जिहाद' वाद निर्माण झाला

महाराष्ट्र विधान भवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली

पुढील लेख
Show comments