Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात जोरदार पाऊस, परतीचा पाऊस नाही हे आहे त्याचे कारण

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (15:11 IST)
राज्यभर परतीच्या पावसाचं जोरदार हजेरी लावली आहे. आधी  मुंबईत रात्री तासभर जोरदार पाऊस झाला. तर दुसरीकडे पुण्यात ऐन पावसाळ्याप्रमाणे रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचले आहे. पुण्यातील बी टी कवडे रोडवर तारादत्त कॉलनीत पावसाचं पाणी तुंबलं असून त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे. या रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने घरात इतकं पाणी साचलं की एखादा ओढा वाहतोय की असे चित्र दिसत होते. घरात पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू पाण्यात तरंगत होत्या. दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या आहे. 
 
मात्र पडणारा पाऊस हा परतीचा नसून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस आला असून, असं हवामान तज्ञ शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले आहे.  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने, महाराष्ट्रात वीजांचा कडकडाट करत संध्याकाळी पाऊस होतो आहे. तर कमी दाबाचा पट्टा काही दिवस तसाच राहणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत पाऊस मेघगर्जनेसह होईल, मग या महिन्याच्या अखेर पाऊस कमी होईल, असं शुभांगी भुते यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments