Publish Date: Tue, 18 Oct 2022 (11:45 IST)
Updated Date: Tue, 18 Oct 2022 (11:48 IST)
हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की यंदा दिवाळीतही महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडू शकतो. पुण्यात ही परतीचा पाऊस सुरूच आहे. उर्वरित महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर वाशिममध्ये दीड लाख हेक्टर शेततळी पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे अकोल्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बारामतीत पाऊस सुरू आहे. गोंदियात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबादच्या खेरमाळा येथे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सोलापूरच्या परभणी, यवतमाळ आणि करमाळा येथेही मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनचा कालावधी 10 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. राज्यात बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली असून हा पाऊस 27 ऑक्टोबर पर्यंत कोसळणार असून ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्टसह नागरिकांना सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. यंदा दिवाळीचा सण पावसाच्या सावटाखाली जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
पुणे, नगर, सोलापूर, ठाणे, कोल्हापूर, बीड उस्मानाबाद या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. परतीचा पाऊस यंदा लांबणीवर गेला असून राज्यात पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.