Festival Posters

राज्यात काही भागात उष्णतेची लाट तर विदर्भ आणि मराठवाड्यात 17 ते 20 मार्चदरम्यान हवामान विभागाने मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला

Webdunia
सोमवार, 16 मार्च 2026 (15:05 IST)
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, १७ ते २० मार्च २०२६ या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार 17 ते 20 मार्च  दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ही स्थिती अवकाळी पावसाची असून काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
 
पावसाचा अंदाज आणि यलो अलर्ट
प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तर १८ आणि १९ मार्च रोजी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड (मराठवाडा)
गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ (विदर्भ)
तसेच काही ठिकाणी सोलापूर, सांगली, सातारा येथेही पावसाची शक्यता.
 
१८ ते २० मार्च दरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. या काळात काही ठिकाणी गारपिटीची  शक्यता देखील नाकारता येत नाही.
 
पावसाची प्रमुख कारणे
उत्तर भारतातून येणारा पश्चिमी विक्षोभ  आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या संयोगामुळे महाराष्ट्राच्या हवामानात हा बदल झाला आहे.
ALSO READ: अजित पवार विमान अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींना भेटणार
सध्या राज्यातील तापमान ४०°C च्या वर गेल्यामुळे हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी वादळी पाऊस हजेरी लावू शकतो.
 
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. सध्या गहू, हरभरा आणि फळबागांची काढणी सुरू आहे. काढलेला शेतीमाल ताडपत्रीने झाकून ठेवावा किंवा सुरक्षित स्थळी हलवावा. तसेच बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला माल पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा उघड्यावर आश्रय घेणे टाळावे, कारण विजा पडण्याचा धोका जास्त असतो.
 
तापमानातील बदल
पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात २ ते ४ अंशांची घट होऊ शकते.
ALSO READ: बोर्डाच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली; महाराष्ट्रात दहावी-बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरणात तब्बल 103 शिक्षक निलंबित
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments