Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार,नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

Webdunia
बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (10:12 IST)
सध्या महाराष्ट्रात पावसाने उच्छाद मांडला आहे.सर्वत्र पाणीच पाणीच दिसत आहे.सदृश्य पूरस्थिती निर्माण झाली आहे.गुलाब चक्रीवादळाचा कहर सर्वत्र दिसून येत आहे.

मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत. 20 लाख हेक्टरवर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी सुरु असून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळं लोकांनी दोन दिवस सावधानता बाळगावी,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक असल्यास लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व जिल्हाधिका-यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उस्मानाबादमध्ये मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह नदी-नाले ओसंडून वाहतायत. पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झालीय. बीडमधल्या केज, अंबेजोगाई, माजलगाव तालुक्यात पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय.

धुवाधार पावसाने बीड जिल्ह्यात थैमान मांडला आहे. जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव तालुक्तयात परिस्थिती गंभीर दिसून येत आहे. यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुले वाहून गेली आहेत तर धरणे भरली आहे.
 
मध्यरात्रीपासून मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. केज तालुक्तयात बंधारे फुटले आहेत, शेती वाहून गेली आहे तसचे रस्ते बंद करावे लागले आहेत. प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि नागरिकांना सर्तक राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

येथील स्थिती बघून एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान बोटसहित दाखल झाले आहेत.

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments