Dharma Sangrah

राज ठाकरे पाडव्याला मेळाव्यात साधणार संवाद

Webdunia
जवळपास १२ वर्षं मराठी माणूस, भूमिपुत्र, मराठी भाषा हे प्रमुख मुद्दे राज ठाकरे लढत आहेत. तर 'खळ्ळ-खटॅक'साठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढचा मार्ग कसा असेल नेमके काय करायचे आहे. त्यांचं 'इंजिन' कुठल्या दिशेनं पुढे जाईल, हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार आहेत.  तर त्या दिवशी अनेक ठिकाणी वीज जाते त्यामुळे आपला कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचू दिला जात नाही त्यासाठी तुमच्या भागातील जो वीज वितरण अधिकारी असेल त्याला भेट द्या आणि जर मेळाव्याच्या दिवशी वीज गेली तर त्या वीज अधिकाऱ्याला तुडवा असा इसारा राज यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
 
मनसेच्या स्थापनेला आज १२ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. १८ तारखेला, गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेत मी माझं म्हणणं मांडेन, असं राज यांनी स्पष्ट केलं. १८ तारखेला मी बोलणार असल्याने बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरू होतात. पण, यावेळी दिवे घालवणाऱ्या अधिकाऱ्यांशी आधी बोलून ठेवा. सभा सुरू असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. कारण, इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील तर त्यांना हिसका दाखवणं गरजेचं आहे, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय खळबळ; पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचा बचाव केला, आरोप निराधार असल्याचे म्हटले

LIVE: जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मुंबईत उभारले जाणार

मुंबई : मालाडमध्ये 'ऍसिड होळी'; कामगारांमधील संघर्षात अनेक जण जखमी

हवामान विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा गंभीर इशारा दिला

पुण्यात अवकाळी पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत तर खडकवासला येथे सर्वाधिक ८८ मिमी पावसाची नोंद

पुढील लेख
Show comments