Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशविरोधी कटाचे राज ठाकरे यांनी पुरावे द्यावेत : पाटील

देशविरोधी कटाचे राज ठाकरे यांनी पुरावे द्यावेत : पाटील
Webdunia
शनिवार, 25 जानेवारी 2020 (16:26 IST)
राज्यात देशविरोधी कट शिजत आहे असे विधान करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याबाबतचे पुरावे द्यावेत, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे केले.
 
मुंबई येथे नसेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी 'राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहे. याची माहिती मी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेट घेऊन देणार आहे,' असे विधान केले होते. 
 
याबाबत कोल्हापूर येथे पत्रकारांनी गृहराज्यमंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ' अशापद्धतीची माहिती गृह विभागाकडे वर्षभर येत असते. तेव्हा त्याची योग्य ती दक्षता पोलीस प्रशासन घेत असते. अशाप्रकारे काही घटना घडत असल्याचे राज यांना माहीत असेल तर त्यांनी या संदर्भातील पुरावे राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे द्यावेत. जेणेकरून त्याची दखल घेऊन योग्य ती काळजी घेता येईल.' 
 
'काही विशिष्ट भागात मौलवींचा वावर वाढला असून तो काळजी वाढवणारा आहे,' असेही विधान ठाकरे यांनी केले होते. च्याचा राज्यमंत्री पाटील यांनी इन्कार केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची राजकी भूमिका बदललेली आहे. त्याला अनुसरून ते विधान करीत आहेत. अशा प्रकारची विधाने करण्यापेक्षा त्यांनी पुरावे दिल्यास उचित कार्यवाही करता येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments