rashifal-2026

गांधी जयंतीच्या निमित्तानं राज ठाकरेंनी केलेलं 'हे' ट्वीट व्हायरल

Webdunia
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (14:40 IST)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज जगभरातून अभिवादन केलं जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. प्रांजळपण आणि तटस्थपण हे गांधीजींच्या ठायी असलेले दोन गुण अंगिकारल्यास आपल्या अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील,' असा विश्वास राज यांनी व्यक्त केला आहे.
 
गांधी जयंतीच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी आज एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. महात्मा गांधी यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नायक आणि काही प्रतिकांमध्येच अडकवण्यात आल्याची खंत त्यांनी सुरुवातीला व्यक्त केली आहे. त्यांच्याकडे कमालीचा प्रांजळपणा व तटस्थपणा होता. एखादी चूक किंवा अपराध, मग तो परकियांकडून घडलेला असो की स्वकियांकडून. त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत. मात्र, नेमकं हेच आज विसरलं जातंय,' असं राज यांनी म्हटलं आहे.
 
'गांधीजींमध्ये (mahatma gandhi) अहंभाव नव्हता. माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा. कारण, ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे हे सांगण्याचा प्रांजळपणा त्यांच्यात होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय (politics) परिप्रेक्ष्यातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं सुरू झालं आहे,' असं राज यांनी म्हटलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

यवतमाळमध्ये बेपत्ता 6 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पोत्यात आढळला, आरोपी ताब्यात

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

अशोक खरात यांच्या अडचणी वाढल्या,100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले

गॅस संकटामुळे मुंबईतील हॉटेल उद्योग अडचणीत, इंडक्शन स्टोव्हची मागणी ३० पटीने वाढली

मालाडमध्ये मुलींवर झालेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला, आरोपींच्या अटकेची मागणी तीव्र

पुढील लेख
Show comments