rashifal-2026

राज ठाकरेंची सरकारला विनंती

Webdunia
मंगळवार, 16 एप्रिल 2024 (14:55 IST)
महाराष्ट्र- गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊसामुळे उष्णता भडकली असून महाराष्ट्रात उन्हाचा जोर वाढला आहे. तसेच उष्णतेच्या लाटेमुळे अनेक लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतांना दिसत आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विनंती केली आहे की शाळेला लवकर सुट्ट्या देण्यात याव्या. कारण महाराष्ट्र राज्यात काही दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उष्णतेच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
 
जागतिक वातावरणातल्या बदलत्या हवामानामुळे यावर्षीचा उन्हाळा अतिउष्ण असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे राज्यामधील नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तसेच उष्णतेमुळे शारीरिक समस्या देखील निर्मण होतांना दिसत आहे. यामुळे राज ठाकरे यांनी सरकारला विनंती केली की, शाळांना लवकर सुट्टी द्या. तसेच पशु-पक्षांची काळजी घ्या असे आवाहन देखील त्यांनी मनसेसैनिकांना केले आहे. 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत की, काही दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्ये तसेच कोकण या भागांमध्ये तापमानाने 40 अंशापर्यंत स्तर गाठला आहे.  इतर जिल्ह्यांमध्ये देखील तापमान वाढत आहे. तसेच उष्णतेची लाट आली आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे. आजून शाळांना सुट्टी लागायला वेळ असून मुले तसेच उन्हामध्ये शाळेत जातांना दिसत आहे. म्हणून शाळांना लवकर सुट्टी लागावी अशी विनंती राज ठाकरे यांनी सरकारला केली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

कारमध्ये प्रेयसीसोबत बसलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने सहा जणांना चिरडले; सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये भीषण अपघात; महामार्गावर अनेक वाहनांची टक्कर, ७ जणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रातील अभयारण्याबाहेरील वाघांसाठी पहिल्यांदाच ५.४० कोटी मंजूर

नवजात बालकांच्या तस्करी प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरने अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात घेतली धाव

मुंबई उच्च न्यायालयाने मद्यधुंद व्यक्तीची भरपाईची याचिका फेटाळून लावली

पुढील लेख
Show comments