Festival Posters

आम्ही लोकांसाठी कामे करूनही हारलो - राज ठाकरे

Webdunia
शुक्रवार, 10 मार्च 2017 (09:43 IST)
आम्ही लोकांसाठी कामे करूनही हारलो मात्र, ज्यांनी लोकांना पैसा वाटला त्यांना जनतेने जिंकून दिले. अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  खंत व्यक्त केली. गेली पाच वर्षे मनसेने भरपूर कामे केली, तरीही मनसे हारली. तर, काही ठिकाणी नावेही माहिती नसणारे लोक केवळ पैशाच्या जोरावर निवडून आले. त्यामुळे जनतेनेच आम्हाला आता कसे लढायचे हे शिकवले, असे राज यांनी यावेळी म्हणाले. मनसेचा 11 व्या वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. 
 
मुंबई महापालिकेत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी निवडणुकांनंतर पहिल्यांदाच आपली भुमिका मांडली. गेली पाच वर्षे मनसेचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामी आले परंतु त्यांना निवडून न देता केवळ ज्या लोकांनी पैसा वाटला त्या लोकांना जनतेनी निवडून दिले. निवडणुकांमधील यंदाचा पराभव हा शेवटचा पराभव असून यापूर्वी आपण सौम्य धोरणांचा वापर करून निवडणुकांना सामोरे गेलो, यापुढे जनतेने यंदा जसे लढायला शिकवले त्याप्रमाणे लढणार. त्यामुळे यापुढे परावभव दिसणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नाशिकमध्ये आम्ही भरपूर कामे केली, बाहेरुन पैसा आणून नाशिक शहराचा कायापालट केला. परंतु नाशिकच्या लोकांनी मात्र बाहेरुन आलेल्या लोकांना निवडून दिले. तुमच्या या पायंड्यामुळे तुमचेच भविष्यात नुकसान होणार आहे असे ही त्यांनी सांगितले.  
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीची तारीख जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक; १५ ऑगस्टपर्यंत मुदत, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार

विदर्भात पारा ४६°C च्या पार, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी

GT vs CSK : आयपीएल २०२६ च्या ६६ व्या सामन्यात चेन्नई आज गुजरातचा सामना करणार

पुढील लेख
Show comments