Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडीने पुढे नेला : बाळासाहेब थोरात

Webdunia
शनिवार, 2 एप्रिल 2022 (08:31 IST)
जयश्री ताईंना निवडणून देणं म्हणजे ताराराणीना अभिवादन आहे हे लक्षात घ्या. राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडी पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे अण्णांच्या माघारी आमची जबाबदारी हे लक्षात ठेवून त्यांना निवडून द्या. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोल्हापुरात बोलत होते.
 
मंत्री थोरात पुढे म्हणाले, ही सभा पाहील्यावर 50 हजारापेक्षा जास्त मतांनी जयश्री ताई निवडून येतील याची खात्री झाली. कोरोनाची बाधा झाली तरी चंद्रकांत जाधवांनी जीवाची पर्वा केली नाही. असेही थोरात म्हणाले. महाविकास आघाडीची संख्या १७१ आहे. ती आपल्याला कायम ठेवायची आहे. तीन पक्ष एकत्र आलो म्हणून अनेकजण म्हणत होते. हा 8/15 दिवसांचा कार्यक्रम आहे.असेही थोरात म्हणाले.
 
प्रत्येक संकटात महाविकास आघाडीने यशस्वी काम केले. हे सरकार कस पडेल? याचा प्रयत्न होत आहे. पण जेवढा लांब करण्याचा प्रयत्न कराल, तेवढे आम्ही जवळ येऊ. असे थोरात म्हणाले. यापूर्वी पेट्रोलची ५० पैसे वाढ झाली तरी भाजप वाले आंदोलन करत होते. आता हे आंदोलक कुठे गेले? हे चंद्रकांत पाटील यांना एकदा विचारा.असेही थोरात म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

सातारा : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगचा केला अवलंब

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

पुढील लेख
Show comments