Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी माझी :आठवले

ramdas athavale
, शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (10:32 IST)

शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, त्यांना 15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतली आहे, असं वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यातल्या जनतेवर इतक्या लवकर निवडणुकांचा बोजा मी पडू देणार नाही, असं आठवले म्हणाले.रामदास आठवले यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला, तरीही सरकार पडणार नाही. कारण 15 आमदार आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहोत. मात्र सरकार पडणारच नाही, कारण शरद पवार हे आतून आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई सायबर सेलकडून २७ तरूणांना नोटीसा