suvichar

रावसाहेब दानवे हे फक्त स्वप्न पहात, अन्… खडसेंचा टोला

Webdunia
शनिवार, 19 मार्च 2022 (21:20 IST)
जळगाव केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. दानवेंच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते एकनाथराव खडसे  यांनी टोला लगावला आहे. भाजपचे  अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवत असतात. आता रावसाहेब दानवे यांनीही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. मात्र, दानवे हे फक्त स्वप्न पाहतात आणि मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा चिमटा खडसे यांनी काढला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.
 
काय म्हणाले होते दानवे?
 
राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहेत. तर सत्ताधारी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून  सरकार खंबीर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं आश्वस्त करण्यात येत आहे. अशात महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. “महाविकास आघाडीतील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील”, असं धक्कादायक विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
 
दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना एकनाथ खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात. चंद्रकांत दादांनी, तर अनेक तारखा दिल्या. मात्र, त्या तारखा मागे गेल्या म्हणत त्यांनी पाटलांवर टीका केली. आता पाटील यावर काही बोलतात का, हे पाहावे लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

भंडारा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू

LSG vs PBKS : आयपीएल २०२६ चा ६८ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स मध्ये खेळला जाणार

LIVE: अकोल्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी लांबच लांब रांगा

मोदी सरकारने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करून महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली

बकरीदपूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडक इशारा! महाराष्ट्रात गोवंश कापला तर थेट 'मकोका' लावणार!

पुढील लेख
Show comments