Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला

Webdunia
सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (08:35 IST)
नाशिक: शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या बाजारात विकल जाणारा हजारो किलो तांदूळ सिनेस्टाईल पकडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एम १५ ई.एच. ३३२६ ही रिक्षा १० ते १२ तांदळाच्या गोण्या घेऊन जात असताना सिडको परिसरात शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या शिताफिने पकडली. यासंदर्भात श्री. बडगुजर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानावर सदर बाब टाकली. जिल्हा पुरवठा कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तांदळाच्या गोण्यांनी भरलेली रिक्षा व रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. जागीच पंचनामा केला. पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी पंचवटीत राहणारा रिक्षा चालक अर्जून स्वामी याची कसून चौकशी केली परंतु त्याने संबंधित रेशन दुकानदाराचे नाव मात्र काहीं करता सांगितले नाही. या संदर्भात पुढील कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करणार आहेत.
 
शिवसेनेचे पंकज जाधव, नाना पाटील, सुभाष गायधनी, अविनाश काकडे, दिग्विजय सोनवणे, कुणाल सोनवणे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर रिक्षा, तांदळाच्या गोण्या व रिक्षा चालकास पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासंदर्भात रेशन ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
 
शासनाच्या वतीने गोरगरिबांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले धान्य हे सर्रासपणे काळ्या बाजारात विकले जात असल्याची बाब शिवसेना कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी सदर माल पकडून दिला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असता त्यांनी पंचनामा केला. केवळ रिक्षा चालकावर कारवाई न करता संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

संबंधित माहिती

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments