Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाऊन काळातच रेशन दुकानदार संपावर; राज्यातील ५५ हजाराहून अधिक दुकाने बंद

Webdunia
मंगळवार, 4 मे 2021 (11:13 IST)
राज्यात कडक लॉकडाऊन सुरू असतानाच राज्यभरातील रेशन दुकानदारांनी संपाचे अस्त्र उगारले आहे. १ मे पासून राज्यातील ५५ हजार रेशन दुकाने यामुळे बंद झाली आहेत. राज्य व केंद्र सरकारने ल़कडाऊन काळात गरिबांसाठी अन्नधान्य मोफत देण्याची घोषणा केली असतानाच रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. त्यामुळे या सर्वांना अन्नधान्य कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
संपाबाबत रेशन दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आर व्ही अंबुस्कर यांनी सांगितले आहे की, आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. आम्ही सातत्याने पाठपुरावा केला मात्र आम्हाला अपयश आले. राज्यभरात जवळपास २०० रेशन दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास ३ हजार दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांचा संयम संपला आहे. ना आम्हाला विम्याचे कवच आहे की अन्य काही सुविधा. तरीही आम्ही सेवा कशी देणार, असा प्रश्न अंबुस्कर यांनी विचारला आहे. ई पॉज मशिनमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यावर सक्षम आणि योग्य पर्याय शोधण्याची गरज आहे. मात्र, सरकार ही बाब गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे आमचा नाईलाज असून आम्ही संप सुरू केल्याचे अंबुस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
 

संबंधित माहिती

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख