Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रत्नागिरी मार्ग बंद, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

Webdunia
गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (09:24 IST)
कोल्हापूर जिल्ह्यात गेली 4 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या ओसांडून वाहत आहेत. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले असून पंचगंगा नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाराऱ्याची पाणी पातळी आज सकाळी 10 वाजता 40 फूट 02 इंच इतकी आहे.तर पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी ४३ फूट इतकी आहे.केर्ली येथे पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद करण्य़ात आला आहे. प्रशासनांकडून नदीकाटावरील गावांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.
 
आज दिवसभरात पावसाचा जोर कमी राहिला तरीही पाणी वाढत असल्याने प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरास सुरुवात केली आहे. काल दिवसभरात सुमारे 50 वर कुटुंबांनी जनावरांसह सोनतळी नवीन वसाहतीमध्ये स्थलांतर केले. एकाच महिन्यात सलग दुसऱ्यावेळी ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागत आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments