Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५८ वर्षांवरुन "इतके" वर्षे होणार? शिंदे सरकार निर्णय घेण्याची शक्यता

Webdunia
शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (21:01 IST)
मुंबई :  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे होऊ शकतं. तसा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचं महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सांगितलं आहे.
 
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय ६० वर्षे आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चिला गेला. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.
 
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ डिसेंबर रोजी महासंघाने एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारलं होतं. मात्र त्यासंदर्भात बैठक झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची एक बैठक निश्चित करण्यात आलेली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. बैठकीत जुनी पेन्शन योजना आणि कर्मचाऱ्यांच्या निवृतीवयासंदर्भात चर्चा होणार आहे. वयाची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं संघटनेने स्पष्ट केलं आहे. महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

महाकुंभ: प्रचंड गर्दीमुळे प्रयागराजला जाणाऱ्या अनेक गाड्या १५ फेब्रुवारीपर्यंत रद्द

विश्वविजेता डी गुकेशचा फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेत प्रवास संपला

टीम इंडिया अहमदाबादमध्ये पोहोचली, एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाणार

LIVE:महाराष्ट्राची कोणतीही योजना बंद होणार नाही, मंत्री उदय सामंत

महाराष्ट्राची कोणतीही योजना बंद होणार नाही, मंत्री उदय सामंत यांनी केला दावा

पुढील लेख
Show comments