rashifal-2026

परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू :महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस

Webdunia
मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (21:04 IST)
पुणे वायव्य राजस्थानातून सोमवारी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. एक आठवडा उशिरा मान्सून माघारी फिरला आहे.
 
17 सप्टेंबरच्या आसपास मान्सून माघारी फिरतो. यंदा त्याचा प्रवास उशिरा सुरु झाला आहे. राजस्थानच्या वायव्य भागात ऍन्टी सायक्लोन स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या भागात गेले पाच दिवस हवामान कोरडे असून, पाऊस झालेला नाही. ही सर्व स्थिती परतीच्या मान्सूनची आहे, असे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
 
परतीचा मान्सूनही बरसणार
दरम्यान, परतीचा मान्सूनही जाताना भरभरुन बरसत असतो. महाराष्ट्रातील काही जिल्हे तर यावरच अवलंबून असतात. यंदाही पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे.
 
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस
 
सध्या दक्षिण छत्तीसगड व लगतच्या भागावर व दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. याच्या प्रभावामुळे कोकण गोव्यातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मुसळधार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवमाडा व विदर्भात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

जपानच्या उत्तर किनाऱ्यावर 7.2 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

पुढील लेख
Show comments