Festival Posters

आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरळीत

Webdunia
शुक्रवार, 8 मार्च 2019 (09:46 IST)
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीच्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25 टक्के प्रवेश गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक कारणाने सुरू होऊ शकला नाही. मात्र गुरूवारपासून राखीव प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे. तिसऱ्या दिवशी राज्यभरातून 39 हजार 163 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
 
पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाच्या जागा गुरूवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये पुण्यातील 963 शाळांमध्ये 16 हजार 619 जागा यंदा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 326 जागांची वाढ झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरूवात झाली. मात्र प्रत्यक्षात पहिले दोन दिवस प्रवेश अर्ज भरता आले नव्हते. त्यामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
 
आरटीई प्रवेशासाठी संकेतस्थळावर मदत केंद्रांचे मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालकांना अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावरून ऍप डाऊनलोड करून घेता येणार आहे. मात्र अजूनही ऍपवरून अर्ज भरणाऱ्यांची संख्या खूप अल्प आहे. आतापर्यंत केवळ 60 अर्ज मोबाइल ऍपवरून भरले गेले आहेत. उर्वरित अर्ज संकेतस्थळावरून पालकांनी भरल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments