rashifal-2026

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांचा 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

Webdunia
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (12:14 IST)
महाराष्ट्र सरकारनं मागण्या त्वरित मान्य न केल्यास 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. 26 तारखेपासून पूर्णपणे अन्नत्याग करणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना नियुक्ताय द्यायला काय हरकत आहे?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदतले मुद्दे
राज्य सरकारच्या काही मुद्द्यांच्या विरोधात मी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला, असं संभाजीराजेंना जाहीर केलं आहे.
 
त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे असे आहेत.
 
सारथी संस्थेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, सारथीसाठी सरकार काय तरतूद करत आहे ते आम्हाला सांगावं.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत सरकारच रक्कम देत नाही, संचालक मंडळ नाही. कर्ज परतावे काढत नसल्यानं बँका यापुढं कर्ज मंजूर करणार नाहीत.
वसतीगृहांच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष आहे. केवळ आश्वासनं दिली आहेत. अनेक वसतीगृहांचे प्रस्ताव आहेत पण ते प्रलंबित आहेत.
कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली, त्यावर पुढील कारवाई कधी होणार?
आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी प्रलंबितच आहे.
राज्य सरकारनं वरील मुद्दे त्वरित सोडवले नाहीत, तर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार. पूर्णपणे अन्नत्याग करणार. आझाद मैदानावर मी एकटा आमरण उपोषण करणार, असा इशारा यावेळी संभाजीराजेंनी दिला आहे.
 
सरकारनं वरील मागण्या मान्य कराव्या ही सरकारला विनंती आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: डिसेंबरच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Badminton आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ५१ धावांनी पराभव केला

लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण? बांगलादेशी खेळाडूवर गंभीर आरोप; आरोपपत्र दाखल

पुढील लेख
Show comments