Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समीर वानखेडे यांची ४ तास चौकशी, चौकशीसाठी दिल्लीतून ५ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल

Webdunia
बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (21:32 IST)
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानकडे २५ कोटी रुपये खंडणी मागितली असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी आणि समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून ५ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. या टीमकडून समीर वानखेडे यांची ४ तास चौकशी करण्यात आली आहे. पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांनी सोशल मीडियावर वानखेडेंवर आरोप केले आहेत.
 
एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांच्या चौकशीची माहिती दिली आहे. या प्रकऱणात पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावीचा जबाब नोंदवण्यासाठी एनसीबीने त्यांना नोटीस पाठवली होती. परंतु त्यांना ती नोटीस मिळाली नाही. यामुळे मीडियाच्या माध्यमातून त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रभाकर साईल याने सोशल मीडियावर २५ कोटी खंडणी मागितील्याचे आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर माहिती द्यावी असे आवाहन एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी केलं आहे.
 
समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली असून त्यांच्याबाबत चौकशी टीम निर्णय घेईल. प्रभाकर साईलने पत्राद्वारे सोशल मीडियावर आरोप केले होते. या आरोपांच्या आधारावर चौकशी टीम गठीत कऱण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली परंतु पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावीची चौकशी होणे बाकी आहे. किरण गोसावी आणि प्रभाकर साईलने चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात हजर राहावे असे आवाहन ज्ञानेश्वर सिंह यांनी केलं आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments