Festival Posters

विद्यार्थी प्रतिनिधींना तिकीटांसाठी आग्रह धरण्याचे आश्वासन – संग्राम कोते पाटील

Webdunia
गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (09:48 IST)
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने थेरगावात राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले.
 
यावेळी बोलताना कोते पाटील म्हणाले की पक्ष संघटनेत निष्ठावंतांना न्याय आहे. घराणेशाहीला स्थान नसून काम करणा-या कार्यकर्त्यांना मान आहे. याचे उदाहरण म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सरकारवर टीका करताना ते म्हणाले, नवीन शासन काळात फक्त घोषणांचा पाऊस पाडण्यात आला प्रत्यक्षात मात्र शासनाकडून जनतेच्या पदरी निराशाच पडली. महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभारावरही त्यांनी टीका केली. गेल्या दोन वर्षापासून आयोगाच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी बेरोजगार असून त्यांची अधिकारी बनण्याची स्वप्ने भंगली आहेत. हे शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे असा आरोप त्यांनी भाजपा सरकारवर केला.
 
या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवा नेते नाना काटे, मयुर कलाटे, सिद्धेश्वर वारणे यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख
Show comments