Marathi Biodata Maker

आता चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे : संजय राऊत

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2017 (16:56 IST)
अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. त्यामुळे त्याबाबत केवळ निंदा करण्याची नव्हे तर चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली.
 
सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदीने काहीच फरक पडला नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला हवा, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले. तसेच संजय राऊत यांनी 1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगितली. 1996 साली अमरनाथ यात्रेवर संकट होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असे ठणकावले होते. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती. तशीच कडक भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.. केंद्रातील भाजप सरकारने याला चोख उत्तर द्यायला हवे. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घ्या. या देशातील 80 कोटी हिंदूंचा वाली कोण, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

भारत-पाक मॅचच्या तिकिट विक्रीवर गोंधळ

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

महाराष्ट्र मध्ये वोटिंगच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोंधळ

Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes in Marathi 2026: छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिननिमित्त शुभेच्छा!

मनपा निवडणूक राज्यभरात जोरात

पुढील लेख
Show comments