suvichar

संजय राऊत यांची सपशेल माघार : 'ते' वक्तव्य घेतले मागे

Webdunia
शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (14:44 IST)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दलचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागे घेतले आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतली आहे. इंदिरा गांधी यांच्याबद्दल मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो, असे त्यांनी म्हटले आहे. 
 
मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक भयंकर होते. त्या काळात गुंड्याला भेटायला अख्खे मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या, अस वक्तव्य राऊत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी हे वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला होता. मात्र, त्यानंतरही वाद थांबला नाही. त्यामुळे अखेर राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.
 
खरंतर काँग्रेसच्यामंडळींनी माझे वक्तव्य मनाला लावून घेण्याची गरज नव्हती. मी आजवर अनेकदा इंदिरा गांधी यांच्या भूमिकांचे समर्थन केलेले आहे. तरीही माझ्या वक्तव्याने इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला तडा गेला असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भाजप आमदार गोविंद सिंग परमार यांचे निधन

हार्ट अटॅक नाही तर हत्या! प्रियकरासाठी पत्नीनेच घेतला पतीचा बळी; २० दिवसांतच थाटला नवीन संसार

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केलेले अर्थसंकल्प, महायुतीने दिलेले वचन पाळले: एकनाथ शिंदे

पुणे मुंढवा जमीन प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची विभागीय चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बिबटे 'वनतारा' मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला

पुढील लेख
Show comments