Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्यजित तांबेंच्या बंडामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले-अजित पवार

Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (08:57 IST)
महाविकास आघाडीचे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आहोत. मविआमध्ये कोणताही संभ्रम नाही.आमच्यात एकवाक्यता आहे. काल नाशिकमध्ये जे झालं ते काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरुन राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या बंडामुळे पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्या महाविकास आघाडीची संयुक्त बैठक असणार आहे. या बैठकीत नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूकीबाबत ऩिर्णय घेणार आहोत.सत्यजित तांबे यांच्या बंडामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. नाशिक पदवीधरसंदर्भात बोलणं सुरु आहे. मी त्याबद्दल कॉंग्रेसला आधीच सावधान केलं होतं. मला आधीच कुणकुण लागली होती. कॉंग्रेसच्या नेत्यांना कल्पना दिली होती. मात्र तरीही काल जे घडलं यामुळे भाजपला संधी मिळाली असल्याचे अजित पवार म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

चिकनसोबत दारु पिण्यासाठी पैसे मागितले, न मिळाल्यास पत्नीची हत्या

नदी पात्रात बुडून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

RR vs PBKS : राजस्थान विरुद्ध पंजाब सामना कोण जिंकणार? प्लेइंग 11 जाणून घ्या

भारतात आला कोरोनाचा नवीन वेरिएंट, जाणून घ्या लक्षण

पुढील लेख
Show comments