Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावरकर क्रांतीवीर होते. चांगले लेखक, कवी होते- पृथ्वीराज चव्हाण

Webdunia
गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (22:01 IST)
राहुल गांधींनी विधान केले. तो विषय तिथे संपला. काळ्या पाण्याची शिक्षा हजारोंना झाली होती. काळ्या पाण्याची शिक्षा वाईट होती. ती सावरकरांना झाली होती. सावरकर क्रांतीवीर होते. चांगले लेखक, कवी होते. त्या व्यक्तीचे मूल्यमापन करणारा तुलनात्मक घेतले पाहिजे. राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली. पुरावे दाखवले. त्यावरून वाद निर्माण झाला. ऐतिहासिक पुरुषांकडे पाहताना सर्व दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे अशा शब्दात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राहुल गांधींच्या विधानावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सावरकरांनी भारताच्या १८५७ च्या युद्धाबद्दल एक भूमिका मांडली होती. ते शिपयांचे बंड नव्हते तर स्वातंत्र्ययुद्ध होते असं पुस्तक लिहिलं होतं. तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर खटला दाखल केला. पॅरिसमधून त्यांना अटक केली. मग त्यांना भारतात आणताना जहाजातून समुद्रात उडी मारली होती. हे खरे आहे. ते क्रांतिकारक होते, लेखक होते. त्यांच्या सगळ्या मतांवर सहमत होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं.
 
परंतु वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांनी १० वर्ष शिक्षा भोगली. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते शिक्षा भोगत होते. कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती. १० वर्षानंतर त्यांची मानसिकता मोडली. तिथून पुढे दुसरा टप्पा सुरू होतो. आणखी ४० वर्ष जेलमध्ये राहायचं म्हणून त्यांनी मला माफ करा, माझी चूक झाली. मी मदत करेन अशी पत्र लिहिली. ते माफीवीर होते असं राहुल गांधींनी म्हटले ते पुरावे दाखवले असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments