Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खुर्चीला हात-पाय बांधले, संबंध बनवले आणि मग चाकूने नवर्‍याचा गळा चिरून खून केला

खुर्चीला हात-पाय बांधले, संबंध बनवले आणि मग चाकूने नवर्‍याचा गळा चिरून खून केला
, शुक्रवार, 12 मार्च 2021 (17:19 IST)
नागपूर येथे एका 28 वर्षीय महिलेने आपल्या 65 वर्षीय नवर्‍याचा गळा चिरुन खून केला. हे ऐकून हैराण झाला नसाल तर हे कशा प्रकारे केले ते वाचून मात्र नक्की आश्चर्य वाटेल. कारण हे प्रकरण धक्कादायक आहे.
 
महाराष्ट्राच्या नागपूर येथे एक महिलेने आपल्या पतीला खुर्चीला बांधले. नंतर दोघांनी संबंध बनवले आणि मग पत्नीने आपल्या पतीची गळा चिरुन हत्या केली. कहाणी येथेच संपत 
 
नसून पोलिसांप्रमाणे ही महिला आपल्या पतीची पाचवी पत्नी होती.
 
 
स्वाति लक्ष्मण मलिक नावाच्या 28 वर्षीय महिलेवर आपल्या 65 वर्षाच्या पति लक्ष्मण रामलाल मलिक यांचा खून केल्याचा आरोप आहे. दोघे नागपूरच्या जरीपटका येथे राहत होते.  
 
पोलिसांप्रमाणे लक्ष्मणला स्वातिचं इतर कोणाशी संबंध असल्याची शंका होती, म्हणून त्याने स्वातिहून जन्माला आलेल्या मुलाला स्वत:चा असल्याचे नकारले होते. यामुळे दोघांमध्ये वाद 
 
होता आणि लक्ष्मण घराहून वेगळा एका मित्राच्या ऑफिसमध्ये राहत होता.
 
पोलिसांप्रमाणे सोमवारी स्वाति लक्ष्मणाला भेटायला मित्राच्या ऑफिसात गेली. स्वातिने आपल्या नवर्‍याचे हात-पाय खुर्चीला बांधले आणि नंतर त्यासोबत संबंध बनवले परंतू यानंतर 
 
तिने चाकुने लक्ष्मणचा गळा चिरला.
 
चौकशीत एका कॅब ड्रायवरने सांगितले की त्याने स्वातिला ऑफिसच्या बाहेर सोडले होते. नंतर पोलिसांनी स्वातिची चौकशी केली तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.
 
माहितीप्रमाणे पैशांमुळे दंपतीत आपसात वाद होत होते. एका हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मी म्हणून रिटायर झालेला लक्ष्मण पाच पत्नी किंवा मुलांसोबत राहत नव्हता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एमपीएसी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करणार - महेबुब शेख