Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर ही खूप गंभीर बाब, शालिनी ठाकरे यांचे ट्विट

Webdunia
मंगळवार, 28 एप्रिल 2020 (22:29 IST)
संपूर्ण देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असतांना काही ठिकाणी पोलिसांवर  जमावाने हल्ला करणे, लॉकडाऊनचं पालन करण्यास सांगितल्याने मारहाण करणे असे धक्कादायक प्रकार घडत आहे. राज्यातही गोवंडी, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद याठिकाणी पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार घडले. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असतील तर राज्यात कायद्याचं राज्य उरलंय का? असा प्रश्न निर्माण होतो. लोक जर पोलिसांवर हल्ले करत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे असं मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.  
 
याबाबत त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, औरंगाबाद आणि पिंपरी येथील घटनांमुळे पोलिसांचं मनोधैर्य जर खचलं तर आजच्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ते परवडणारं नाही. पोलिसांवर हात उगारणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कोणत्याही धर्माचा-समाजाचा असेना, गृहमंत्र्यांनी असा धडा शिकवावा की, पुन्ही तशी चूक करण्याची हिंमत कुणीही करणार नाही असं शालिनी ठाकरे यांनी मागणी केली आहे.  
 

संबंधित माहिती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments