Marathi Biodata Maker

सरकार शेतीचे अर्थकारण संपुष्टात आणतेय- शंकर अण्णा धोंडगे

Webdunia
मागील तीन वर्षांपासून शासनाच्या रडारवर राज्यातील शेतकरी आहेत. शेतीचे अर्थकारण संपुष्टात आणण्यासह शेतकऱ्यांना भिकारी करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्याक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी केली आहे. राष्ट्रवादी किसान सभेतर्फे ऑगस्ट क्रांतिदिनापासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवाग्राम ते नाशिकदरम्यान शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान यात्रा काढण्यात येत आहे. यानिमित्ताने आज मठपिंपळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे शेतकरी, शेतमालाच्या यांची महासभा झाली.
 
शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार केवळ पोकळ आश्वासनांची खैरात करण्यासह फसव्या घोषणा करत असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना जे निर्णय घेतले होते, ते सर्व निर्णय या सरकारने बदलून टाकले आहेत, अशी टीका धोंडगे यांनी केली. 
 
व्यावसायिकांप्रमाणे शेतकऱ्यांनादेखील तारण जमिनीच्या मूल्यांकनाच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून द्यावे, आर्थिक, सामाजिक सुरक्षा कायदा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न किमान चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांइतके सुरक्षित करा आदी मागण्यांसाठी हे अभियान सुरु केल्याचे धोंडगे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

एलेना रायबाकिना आर्यना सबालेंला पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती ठरली

IND vs NZ:पाचव्या T20 मध्ये किवींना 46 धावांनी हरवून भारताने मालिका 4-1 ने जिंकली

2026 च्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 2300 अंकांनी घसरला, निफ्टी 500 अंकांनी घसरला

या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा! जाणून घ्या काय स्वस्त झाले

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 LIVE: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

पुढील लेख
Show comments