suvichar

माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार - शरद पवार

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (16:40 IST)

स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई शहरात माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माथाडी कामगारांच्या वतीने खासदार शरद पवार  यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , ज्येष्ठ नेते गणेश नाईक , आमदार नरेंद्र पाटील ,   संदीप नाईक, किरण पावसकर, महापौर सुधाकर सोनावणे, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत चालली आहे ही गंभीर बाब आहे. सरकार कंत्राटी कामगारांना संरक्षण देत नाही, हे चांगले नाही, असे मत यावेळी पवार यांनी मांडले. आजच्या कार्यक्रमात काही कारणास्तव मुख्यमंत्री आले नाहीत पण आम्ही त्यांची स्वतंत्र वेळ घेऊन माथाडी कामगारांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडू, असे आश्वासनही त्यांनी दिले. माथाडी कामगारांचे मुंबई उभारण्यात महत्त्वाचे योगदान आहे. मेहनतीने काम करतानाच भविष्याची चिंताही माथाडी कामगारांना असते. म्हणूनच या कामगारांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले. आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रयत्न करू. आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी एक बैठक झाली तर नक्कीच माथाडी कामगारांचे प्रश्न सुटतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: बीएमसीच्या नामांकित १० नगरसेवकांची नावे जाहीर झाली

नागपूर: निरोप समारंभात झालेल्या निषेधामुळे ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला

नवी मुंबईतील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल- मुख्यमंत्री फडणवीस

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाहनांवर लावण्यात येणाऱ्या हरित करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

पुढील लेख
Show comments