rashifal-2026

शरद पवारांनी महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला, कोणते प्रश्न सोडवणार सांगितले

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (18:41 IST)
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माविआने बऱ्याच जागा जिंकल्यावर त्यांच्या आशा वाढल्या आहे. माविआने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाची जय्यत तयारी सुरु केली आहे. या वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आपला पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. 

आमचा पक्ष सत्तेत आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे शरद पवार म्हणाले. ते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील नीरा वागज गावात शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार नाही. पण राज्यात निवडणुका होणार असून राज्यात आपल्या पक्षाचे सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे ते म्हणाले. 
 
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA), काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP (SP) यांची युती, महाराष्ट्रात 48 पैकी 30 जागा जिंकल्या. काँग्रेसने 13, शिवसेनेने (यूबीटी) 9 तर राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) 8 जागा जिंकल्या.

राज्यात सत्ताधारी महायुतीत  भारतीय जनता पक्ष (भाजप), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीने 17 जागा जिंकल्या, तर एक जागा अपक्ष उमेदवाराला गेली. भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली. अशा प्रकारे महायुतीला 17 जागा मिळाल्या.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments