suvichar

शरद पवारांनी केले मोठे विधान

Webdunia
शुक्रवार, 22 मार्च 2024 (15:30 IST)
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विरोधकांनी त्यांच्या अटकेनंतर केंद्र सरकार तसेच भाजपावर आगपाखड केली. या मुद्यावरून शरद पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास केजरीवाल यांच्या घरी  ईडीची टीम 10वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन पोहोचली. तसेच रात्री 9च्या सुमारास  दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ‘आप’तर्फे जोरदार निदर्शनं केजरीवालांच्या अटकेनंतर करण्यात आली. इंडिया आघाडीसह विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. शरद पवार यांनीही केजरीवाल यांची अटक चुकीची आहे, असे सांगत केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला. देशभरात आपच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी संध्याकाळी ईडीच्या कारवाईनंतर निषेध नोंदवला. केंद्र सरकार आणि भाजपावर कडाडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनीही या मुद्यावरून हल्ला चढवला. केजरीवालांच्या अटकेचा निषेध शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी नोंदवला. शरद पवार यांनी ‘मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानेच केजरीवालांवर कारवाई करण्यात आली ‘ असा आरोप केला. तसेच  भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही केला. भाजपकडून भीती पसरवण्याचे काम निवडणुकीच्या काळात सुरू आहे. आधी हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक केली. तर आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. माहिती नाही उद्या कोणाला अटक करतील. शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला, केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत. ईडीचा वापर करून राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर कारवाई केली जाते. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून लक्ष्य केलं जात आहे.त्यांना तुरूंगात टाकण्यात येत आहे.ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे.  आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली होती.  शरद पवार म्हणाले की, राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे. तसेच शरद पवार असेही म्हणालेकी, मोदींच्या भूमिकेला  केजरीवाल हे दिल्लीत बसून  विरोध करतात. म्हणून  त्यांच्या विरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणालेत.  

Published By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात ऊर्जा व्यवस्थापनात एआयचा वापर

बल्लारशाह ते मुंबई दरम्यान नवीन ट्रेनची घोषणा करण्यात आली

२० ते २२ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना ३०% मालमत्ता कर सवलत मिळणार असल्याची बातमी खोटी, पुणे महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिले

सक्तीच्या धर्मांतराच्या आणखी एका प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली

पुढील लेख
Show comments