Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांनी केले मोठे विधान

Webdunia
शुक्रवार, 22 मार्च 2024 (15:30 IST)
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विरोधकांनी त्यांच्या अटकेनंतर केंद्र सरकार तसेच भाजपावर आगपाखड केली. या मुद्यावरून शरद पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास केजरीवाल यांच्या घरी  ईडीची टीम 10वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन पोहोचली. तसेच रात्री 9च्या सुमारास  दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ‘आप’तर्फे जोरदार निदर्शनं केजरीवालांच्या अटकेनंतर करण्यात आली. इंडिया आघाडीसह विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. शरद पवार यांनीही केजरीवाल यांची अटक चुकीची आहे, असे सांगत केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला. देशभरात आपच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी संध्याकाळी ईडीच्या कारवाईनंतर निषेध नोंदवला. केंद्र सरकार आणि भाजपावर कडाडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनीही या मुद्यावरून हल्ला चढवला. केजरीवालांच्या अटकेचा निषेध शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी नोंदवला. शरद पवार यांनी ‘मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानेच केजरीवालांवर कारवाई करण्यात आली ‘ असा आरोप केला. तसेच  भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही केला. भाजपकडून भीती पसरवण्याचे काम निवडणुकीच्या काळात सुरू आहे. आधी हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक केली. तर आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. माहिती नाही उद्या कोणाला अटक करतील. शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला, केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत. ईडीचा वापर करून राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर कारवाई केली जाते. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून लक्ष्य केलं जात आहे.त्यांना तुरूंगात टाकण्यात येत आहे.ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे.  आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली होती.  शरद पवार म्हणाले की, राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे. तसेच शरद पवार असेही म्हणालेकी, मोदींच्या भूमिकेला  केजरीवाल हे दिल्लीत बसून  विरोध करतात. म्हणून  त्यांच्या विरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणालेत.  

Published By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

इराणसोबतच्या तणावादरम्यान, अमेरिकेचा मोठा निर्णय; ७५ देशांचे सर्व व्हिसा निलंबित

जप्त केलेल्या रुपयांच्या व्याजाचा अर्धा भाग सशस्त्र सेना कल्याण निधीत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आदेश

महायुती २९ पैकी इतक्या महानगरपालिकांवर नियंत्रण ठेवेल; उपमुख्यमत्री फडणवीसांचा दावा

पुढील लेख
Show comments