Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांनी पावसात भिजून आणलेलं सरकार आता जनतेचा घाम काढतंय: अनिल बोंडे

Webdunia
गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:56 IST)
वर्धा : शरद पवारांनी पावसात भिजून सरकार आणलेलं सरकार आता जनतेचा घाम काढतंय अशी टीका माजी कृषीमंत्री अनिल बोंडे  यांनी केली आहे. शरद पवार पावसात भिजले म्हणून सरकार आलं असं म्हटल्या जातं आणि आता हेच सरकार लोडशेडिंग करून जनतेचा घाम काढतंय असा घणाघात बोंडेंनी केला आहे.
 
माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. सेनेसह महाविकास आघाडीतील हजारो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. वर्ध्याच्या आर्वी मतदार संघात पार पडलेल्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला गुड बाय केलं आहे. सत्ता असताना देखील कार्यकर्ते पक्ष सोडत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
 
जिल्ह्यातील राजकारणात बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा सध्या वर्ध्यात सुरु आहे. सोबतच नवाब मलिक यांच्यावर देखील अनिल बोंडेंनी निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी बेहिशोबी मालमत्ता कुणाच्या भरवशावर केलीय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments