rashifal-2026

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी

Webdunia
गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (21:19 IST)
विधानसभेत आज मोठा गदारोळ झाला. कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत दिली. या उत्तराला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यातच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
 
आदिवासी समाजासाठी आपण काहीच करू शकलो नाही याची लाज वाटली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या शब्दावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. हा असंसदीय शब्द असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मुनगंटीवार म्हणाले की, तुम्ही गेले अडीच वर्षे सत्तेत होते. त्यामुळे तुमच्या वडिलांना (म्हणजे उद्धव ठाकरे) लाज वाटली पाहिजे असे म्हणायचे का? यानंतर सभागृहात एकच गदारोळ माजला. दोन्ही बाजूच्या आमदारांनी एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
कुपोषणासंदर्भातील सर्व माहिती उच्च न्यायालयात दिल्याचे गावित यांनी सांगितले. आदित्य यांच्याशिवाय काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही गावित यांच्या प्रश्नावर आक्षेप घेत हे असंवेदनशील असल्याचं म्हटले आहे. त्याचवेळी मंत्र्यांचे उत्तर टेबलवरून काढून टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या वतीने करण्यात आली.
 
आदित्य म्हणाले की मंत्री कुपोषणाबाबत चुकीची माहिती देत आहेत. आदिवासी समाजाची अवस्था पाहिली तर राजकारणी म्हणून लाज वाटेल, असे ते म्हणाले. शिवसेना आमदाराच्या उत्तरानंतर मुनगंटीवार संतप्त होऊन त्यांनी संसदीय भाषा वापरायला हवी होती, असे म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने हरवून मालिका जिंकली

पुढील लेख
Show comments