Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना रामदास कदम यांच्यावर नाराज, पालकमंत्री पद काढले

shivsena
Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:36 IST)
शिवसेनेत अंतर्गत कलह दिसून येतो आहे. यात रामदास कदम यांना शिवसेना  पक्षाती नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येते आहे. या नाराजी मुळे  त्यांना औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन हटविण्यात आले असणार असे चित्र निर्माण झाले आहे. यात नवीन निर्णयानुसार राज्य शासनाने तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदललेले आहेत.  याबाबतचे राज्य सरकारने अधिकृत  परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता या शासनाच्या नवीन निर्णयानुसार औरंगाबादचे पालकंमत्रीपद रामदास कदम यांच्याकडून काढून घेऊन ते डॉ. दीपक सावंत यांच्याकडे दिले आहे.  औरंगाबादच्या नामांतरावरून खासदार चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यात वाद झाला होता. या वादावरुन त्यांना हटविल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच भाजपवरही कदम यांनी जोरदार टीका केली. खैरे यांच्या वादानंतर रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून काढेल आहे असे  चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता रामदास कदम काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

नागपुरात शीतपेय प्यायल्यानंतर विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

नागपुरात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या

LIVE: नागपुरात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या

कल्याण अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोपी विशाल गवळीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

DC vs MI Playing 11: मुंबई जिंकण्याचा प्रयत्न करत दिल्लीच्या आव्हानाला समोर जाईल,संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments