rashifal-2026

...तर शरद पवार पंतप्रधान झाले असते

Webdunia
गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (11:16 IST)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते पंतप्रधान झाले असते. कारण त्यावेळी त्यांच्या तोडीचा दुसरा अन्य नेता कोणीही नव्हता, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुार शिंदे यांनी सांगितले.
 
शरद पवार हे आपले गुरू तर आहेतच शिवाय ते अतिशय चलाख नेते आहेत. त्यांना भविष्यातील सर्व काही उमजते. असा गुरू मला लाभला हे माझे भाग्य समजतो, असेही शिंदे म्हणाले. 
 
शिंदे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना विविध मुद्द्यांना स्पर्श केला. यापूर्वी दोनवेळा भाजपचे सरकार सत्तेवर आले; परंतु ज्या पध्दतीने त्यांनी काम केले, ते काम जनतेला रुचले नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजाने त्यांना पाउतार व्हावे लागले. त्यावेळी शायनिंग इंडियाचा जोरात प्रचार झाला होता. आताही त्याप्राणेच स्टॅन्डअप आणि स्टार्टअप इंडियाचा प्रचार सुरू आहे. केवळ या सरकारकडून घोषणाबाजी सुरू आहे अंलबजावणी मात्र शून्य आहे. त्यामुळळे हे सरकार आता सीटडाउन झाले असून लवकरच ते स्लीपडाउन होईल, अशी स्थिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण जवळून पाहिले आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे पक्षाचे प्रभारी असताना त्यांची माझी नेहमीच भेट व्हायची. मात्र, ते चहा विकत होते, असे कधी ऐकणत आले नाही. ते आताच चहावाले कसे काय झाले? आता त्यांच्या लोकांसाठी तरी त्यांनी काही करून दाखवावे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अपार्टमेंट घोटाळ्यात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली

'मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप-शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला युतीपासून दूर ठेवतील,' विजय वडेट्टीवार यांचे महापालिका निवडणुकीवर वक्तव्य

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा

जायरा वसीम नितीश कुमार यांच्यावर संतापल्या; हिजाब ओढल्याबद्दल केली टीका, म्हणाल्या- "मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी"

"केंद्र सरकार महात्मा गांधींच्या विचारांचा आणि गरिबांच्या हक्कांचा द्वेष करते," राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

पुढील लेख
Show comments