suvichar

राष्ट्रीय महामार्ग वरील सिन्नर-खेड टप्प्यासाठी पथकर सुरु

Webdunia
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे नाशिक महामार्गवरील  सिन्नर ते खेड या दरम्यानच्या टप्प्यासाठी दोन ठिकाणी पथकर सुरु करण्यात आला आहे असे प्रकल्प संचालक पी जी खोडसकर यांनी कळविले आहे.
 
सिन्नर ते खेड या शहरांच्या दरम्यानच्या 138 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी फक्त104 किमी लांबीचे 75टक्के काम पूर्ण झाले आहे. आरेखन, बांधा, वित्तसहाय्य, प्रचालन(वापरा) व हस्तांतरीत करा(डीबीएफओटी) या तत्वावर बांधण्यात झालेल्या या कामासाठी शासन व बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या करारातील तरतूदीनुसार हा पथकर लागू करण्यात आला आहे. हा महामार्ग नाशिक ,अहमदनगर व पूणे या जिल्हयातून जात आहे. यामधील हिवरगाव पावसा व चाळकवाडी या दोन ठिकाणी टोल वसूली करण्यात येणार आहे. उर्वरित काम ऑगस्ट 2017 पर्यंत पूर्ण होणार आहे.
 
चाळकवाडी येथील पथकरचे दर रुपये पुढीप्रमाणे आहेत.
 
कार जिप आदी हलक्याय वाहनासाठी एकेरी वाहतूक 40 रु. परतीची वाहतूक 60 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 20 रु. हलक्या वाणिज्य वाहनांसाठी (एल एम व्ही) एकेरी वाहतूक 65 रु. परतीची वाहतूक 95 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 30 रु. ट्रक व बस वाहनांसाठी एकेरी वाहतूक145 रु. परतीची वाहतूक 215 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 70 रु.
 
हिवरगांव पावसा येथील पथकरचे दर रुपये पुढीप्रमाणे आहेत.
 
कार जिप आदी हलक्याय वाहनासाठी एकेरी वाहतूक 70 रु. परतीची वाहतूक 105 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 35 रु. हलक्या वाणिज्य वाहनांसाठी (एल एम व्ही) एकेरी वाहतूक 115 रु. परतीची वाहतूक 170 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 55 रु. ट्रक व बस वाहनांसाठी एकेरी वाहतूक260 रु. परतीची वाहतूक 395 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 130 रु.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments