Dharma Sangrah

भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहिणही शेततळ्यात बुडाली, दोघांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 18 जानेवारी 2022 (16:03 IST)
पाटण तालुक्यातील रोमनवाडी-येराड येथे फार्महाऊसवरील शेततळ्यात बुडून बहिण, भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सौरभ अनिल पवार (16) आणि पायल अनिल पवार (14) असे या मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. मासेमारी करणार्‍यांच्या साह्याने शोध घेऊन रात्री सातच्या सुमारास बहिण-भावाचे मृतदेहबाहेर काढण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे रोमनवाडी -येराड येथे एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस वर सचिन जाधव कामासाठी आहे. सोमवारी सचिन यांच्याकडे त्यांचे नातेवाईक अनिल पवार आपल्या कुटुंबाला घेऊन भेटावयास आले होते. ते कामानिमित्त विजयनगर येथे वास्तव्यास आहे. मुलगा सौरभ हा आयआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर मुलगी पायल ही इयत्ता आठवीत होती. पवार कुटुंब सचिन जाधव यांच्याकडे भेटायला आले होते.
 
सौरभ आणि पायल हे फार्महाउस पाहण्यासाठी गेले असता काळाने त्यांच्या मुलांवर झडप घातली आणि सौरभचा पाय घसरून तो फार्महाउस जवळच्या शेततळ्यात पडला. आणि बुडू लागला . आपल्या मोठ्या भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहीण पायल ही देखील पाण्यात बुडू लागली आणि क्षणातच हे दोघे भाऊ बहीण शेततळ्याच्या पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळतातच सचिन जाधव आणि मुलांचे आईवडील शेततळ्याजवळ पोहोचले तो पर्यंत ते दोघे बुडाले होते. ही दुर्देवी घटना सोमवारी सांयकाळी घडली. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांसह गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह रात्री उशिरा मच्छीमार करणाऱ्या मुलांच्या मदतीने काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आले . मुलांचे मृतदेह पाहता आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments