Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार त्यांच्याबद्दल रत्नागिरीच्या सभेत सविस्तर बोलणार आहे- राज ठाकरे

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2023 (07:52 IST)
यावर अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे सांगितले होते. या संदर्भात राज ठाकरे यांना एका कार्यक्रमात अजित पवार यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे  म्हणाले की, त्यांच्याबद्दल रत्नागिरीच्या सभेत सविस्तर बोलणार आहे.
 
एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यातील विविध नेत्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी काही मजेशीर उत्तरे दिली आहेत.
 
यावेळी राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विचारले असता  जपून राहा असा सल्ला देणार, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारले असता वरती संबंध नीट ठेवा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता त्यांना काय सांगणार स्वयंभू आहेत असे ते म्हणाले. यावेळी त्यांना अजित पवार यांच्याबद्दल विचारले असता राज ठाकरे यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे.
 
राज ठाकरे म्हणाले की, खर तर मला 5 तारखेच्या रत्नागिरीच्या सभेमध्ये त्यांच्याबद्दल सविस्तर बोलायचे आहे, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, मला एका वाक्यात बोलता नाही येणार नाही, पण तरीही त्यांना सल्ला देईल की, बाहेर जेवढे लक्ष देत आहात तेवढं काकांकडेपण लक्ष द्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments