Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरीही त्र्यंबकेश्वरला दिंड्या दाखल

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (08:13 IST)
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भरणारी पौषवारी शासनाने रद्द केली असली तरी राज्यभरातून दिंड्या त्र्यंबकेश्वरला दाखल होत २८ जानेवारी रोजी होणा-या वारी पूर्वीच १५ दिवस अगोदर दिंडया येत आहेत. नगर, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, पुणे यासह नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी पायी दिंडीने किमान दोन लाख वारकरी पायी येत असतात. जवळपास ५०० ते ६०० दिंडयांची नोंद होत असते. यावर्षी कोविडच्या कारणाने वारी रद्द झाली. मात्र वारकरी भाविक पाच दहाच्या जथ्याने पायी येत आहेत. एक दिवस मुक्काम करून पुन्हा परतीचा प्रवासाला सुरूवात करत आहेत. सोबत विणा झेंडे यासह पालखी ठेवलेले रथ देखील दिसून येतात. नाथांच्या मंदिरात फुगडया घालत अभंग म्हणत आपली सेवा रूजू करतात. वारी बंद असेल म्हणून काय झाले त्र्यंबकेश्वर येथील प्रत्येक दिवस वारीचाच आहे.नाथांच्या समाधी दर्शनाने कृतार्थ होत आहोत. ब्रह्मगिरीच्या दर्शनाने आणि कुशावर्तातील गोदामायीच्या स्पर्शाने गहीवरून येत असल्याच्या भावना वारकरी व्यक्त करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: बुलढाण्यात भीषण रस्ता अपघात

अमेरिकेने उचलले मोठे पाऊल, संगणक चिप आणि औषधांच्या आयातीची चौकशी सुरू

एमबाप्पेला मिळाले सहा वर्षांत पहिले रेड कार्ड, रिअल माद्रिदने अलाव्हेजवर 1-0 असा विजय मिळवला

मुंबईहून गोव्यात अवघ्या काही तासांत पोहचता येईल, नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी

उत्तर-मध्य नायजेरियात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments