Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ ; एकाच दिवसात घेतला ८ जणांना चावा

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (15:25 IST)
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.  दिवसभरात आठ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यात सहा जण हे जळगाव शहरातील असून एक धरणगाव येथील तर एक ११ वर्षीय मुलगी भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील आहे. या सर्व रुग्णांवर जीएमसीत प्राथमिक उपचार करण्यात आले असून गंभीर रुग्णांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात व रुग्णालयात रेफर करण्यात आले.
 
जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असतानाही प्रशासनही कोणतीही अंमलबजावणी करताना दिसत नाही. भटक्या कुत्र्यांचा वावर संपूर्ण शहरात वाढला आहे. शहरात भटकी कुत्री गल्लोगल्ली बघायला मिळतात. नागरिकांनी फेकलेल्या अन्नपदार्थांवर आपली भूक भागवून ही कुत्री इकडे तिकडे फिरत असतात.
 
मात्र या भटक्या कुत्र्यांवर प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. ही कुत्री विशेषत: लहान मुलांना लक्ष्य करतात आणि चावा घेतात. काल एकाच दिवसात आठ जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. दरम्यान प्रशासनाने कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता, लवकरात लवकर खबरदारीचे पाऊल उचलावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री नितेश राणे यांनी एका नवीन उपक्रमाचा शुभारंभ केला

PM मोदी मॉरिशसच्या दौऱ्यावर

वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर हल्लाबोल करीत उद्धव ठाकरे अर्थसंकल्प बोगस असल्याचे म्हणाले

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments