Marathi Biodata Maker

पहिली ते आठवीच्या विद्यार्थांना आजपासून घरच्या घरीच मिळणार शिक्षणाचे धडे

Webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (10:49 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही कोणतेही क्षेत्र पुर्णपणे चालू केली नाहीत. मुलांच्या शाळाही अजून बंद आहेत. त्यामुळे किती दिवस असं चालणार कारण परीक्षा रद्द करून सर्वांना पुढील वर्गाच प्रवेश दिला. पण आता चालू वर्ग कधी भरणार याची प्रतीक्षा पालकांनाही लागली आणि विद्यार्थ्यांनाही. या दरम्यान अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक मोठा मिर्णय घेतला आहे.
 
पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनीवरून 20 जुलै पासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जाणार आहे आणियत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या मालिकेचा लाभ घ्यावा, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
 
दररोज प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ 60 दिवसात 60 एपिसोडमध्यो सादर केले जाणार आहेत. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार अशे दहा आठवडे हा उपक्रम चालणार आहे. या मालिकेचे नाव टिलीमिली असणार आहे.
 
ज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या संस्थेच्या सहकार्यातून आणि ‘एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शैक्षणिक मालिका सुरू केली जात आहे.
 
दरम्यान, प्रत्येक इयत्तेला एक तास मिळणार आहे. सकळी 7:30 पासून ही शाळा भरणार आहे. सर्वात पहिला आठवीचा तास भरणार आहे. त्यानंतर तासातासाने ,सातवी, सहावी, पाचवी, चौथी, तिसरी, दुसरी आणि पहिलीचा तास भरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments