Dharma Sangrah

आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2017 (12:14 IST)

गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

सौराष्ट्र, कच्छ भागात उष्णतेची लाट कायम असून, तेथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढले आहे़ गुजरात, पश्चिम राजस्थान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल २२ शहरांचे कमाल तापमान ४० अंशावर नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंशावर स्थिर असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. मुंबईत उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून, आर्द्रतेमध्येही वाढ होत आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

LIVE: शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह एमएमआरच्या प्रमुख शहरांमध्ये महिला महापौरांची नियुक्ती

पुणे पोर्श अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, तीन आरोपींना जामीन मंजूर

भारताविरुद्ध न खेळण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर बीसीसीआयने दिली प्रतिक्रिया

BMC मध्ये भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड, लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित !

शर्मिला गायकवाड ठाण्याच्या महापौर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह प्रमुख एमएमआर शहरांमध्ये महिला महापौरांच्या नियुक्ती

पुढील लेख
Show comments