rashifal-2026

दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष: सुनील तटकरे

Webdunia
नगरपालिका निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ नगरपालिकांच्या ३२४ जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले होते. गुरुवारी लागलेल्या या निवडणुक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत चिन्हावर सर्वाधिक ९३ जागांवर विजय संपादन केला आहेत. तसेच शिरुर येथील राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीने १२ जागा जिंकल्या असून दुसऱ्या टप्प्यातील निकालात शंभरहून अधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
 
पुढे ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लातूर जिल्ह्यातील औसा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तसेच शिरुर येथे आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे. यापैकी बारामती नगरपालिकेच्या ३९ जागांपैकी ३५ जागा जिंकत एकहाती विजय मिळविला आहे. तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पोर्णिमा तावरे या विजयी झाल्या आहेत. तसेच लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेत २० पैकी १२ जागांवर पक्षाने विजय संपादित केला असून इथे अफसर शेख हे नगराध्यक्ष पदी विजयी झालेले आहेत. शिरुर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिरुर विकास आघाडीने २१ पैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे. इथे वैशाली जाधव नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

पश्चिम रेल्वे १५० विशेष गाड्या चालवणार, बहुतांश मुंबईहून सुटणार

LIVE: रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा सामना घरच्या मैदानावर केकेआरशी होईल

मुंबई लोकल ट्रेनमध्ये १५ डबे असणार? शिंदे-ठाकरे गटाच्या खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आवाहन केले

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार

पुढील लेख
Show comments