Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

५० तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही तरी मुख्यमंत्री म्हणतात दुष्काळ नाही - सुप्रिया सुळे

supriya sule
Webdunia
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (09:28 IST)
राज्यातील ५० तालुक्यांमध्ये पाऊसच झाला नाही तरीही सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी तयार नाही. अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई आहे मात्र मुख्यमंत्री म्हणतात राज्यात दुष्काळ नाही. सरकार इतके असंवेदनशील आहे की यांना जनतेची काहीच चिंता जाणवत नाही अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी व्यक्त केली. आसोदा येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
 
सुप्रिया सुळे यांनी पुढे एकंदरीतच सरकारच्या चुकीच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. सरकार पेट्रोल डिझेलच्या भाववाढीबाबत अतिशय असंवेदनशीलपणा दाखवत आहे. रुपया मोठ्या प्रमाणावर घसरला आहे अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी, डॉक्टर्स, वकील असे सगळेच घटक या सरकारच्या कार्यकाळात नाराज आहेत. बहुमताच्या जोरावर बदल घडवून आणण्याचा डाव या सरकारने आखला आहे. हे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. यातून राज्याचे व देशाचे नुकसान होत आहे असेही त्या म्हणाल्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सिंधू जल करार काय आहे? भारताने करार थांबवल्याने लाखो पाकिस्तानी पाण्याच्या एक-एक थेंबासाठी आसुसतील!

Terror attack in Pahalgam उपमुख्यमंत्री अजित पवारांची जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा

पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार लवकरच तुरुंगात जातील म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

प्रेयसीच्या भावाने केली नववीच्या विद्यार्थ्याची गळा दाबून हत्या

LIVE: पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार लवकरच तुरंगात असतील म्हणाले फडणवीस

पुढील लेख
Show comments