Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

५० तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही तरी मुख्यमंत्री म्हणतात दुष्काळ नाही - सुप्रिया सुळे

Webdunia
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (09:28 IST)
राज्यातील ५० तालुक्यांमध्ये पाऊसच झाला नाही तरीही सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी तयार नाही. अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई आहे मात्र मुख्यमंत्री म्हणतात राज्यात दुष्काळ नाही. सरकार इतके असंवेदनशील आहे की यांना जनतेची काहीच चिंता जाणवत नाही अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी व्यक्त केली. आसोदा येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
 
सुप्रिया सुळे यांनी पुढे एकंदरीतच सरकारच्या चुकीच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. सरकार पेट्रोल डिझेलच्या भाववाढीबाबत अतिशय असंवेदनशीलपणा दाखवत आहे. रुपया मोठ्या प्रमाणावर घसरला आहे अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी, डॉक्टर्स, वकील असे सगळेच घटक या सरकारच्या कार्यकाळात नाराज आहेत. बहुमताच्या जोरावर बदल घडवून आणण्याचा डाव या सरकारने आखला आहे. हे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. यातून राज्याचे व देशाचे नुकसान होत आहे असेही त्या म्हणाल्या. 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments