rashifal-2026

सुप्रियाताई मीठाचा खडा टाकणे बरोबर नाही भाजपकडून प्रत्युत्तर

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (09:25 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nanrendra Modi) यांच्या देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतून टीका केली जात आहे. त्यावर भाजपकडून आता प्रत्युत्तर दिले जात आहे. सुप्रिया सुळे यांनी सुरु केलेल्या या विषयावर भाजप नेते प्रविण दरेकरनंतर आशिष शेलार यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
 
माध्यमांशी बोलतांना शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सरकारी किंवा पक्षाच्या नव्हता. तो देवस्थानाने आयोजित केलेला कार्यक्रम होता. देवस्थानाच्या कार्यक्रमावर सुप्रियाताईंनी टीका करावी, हे बरोबर नाही. तरीही त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने अजित पवार यांना भाषण करायला सांगितले. परंतु त्यांनीच नकार दिला. खरंतर सुप्रियाताई प्रत्येक गोष्टीत राजकारण करुन मीठाचा खडा टाकणे बरोबर नाही. तुम्ही थोडी माहिती घेऊन वक्तव्य केले असते तर बरे झाले असते.
 
काय आहे प्रकार
 प्रोटोकॉल प्रमाणे उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या वतीने अजित पवार यांना भाषणासाठी संधी देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना भाषण करु दिलं नाही ही दडपशाही असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजित पवारांना भाषणाला पंतप्रधान कार्यालयातुन नकार आला, हे मला वेदना देणारं आहे. महाराष्ट्र राज्याचा हा अपमान आमच्या उपमुख्यमंत्र्यांना भाषण न करू देणं हे धक्कादायक आहे." त्यानंतर आता काँग्रेसच्या सचिन सावंत यांनीही ट्विट केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

युरोप चुकीच्या दिशेने जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार, अलर्ट जारी

हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

पुढील लेख
Show comments