Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकसह या चार शहरांमध्ये होणार ‘स्वनिधी सांस्कृतिक महोत्सव’;काय आहे तो?

Webdunia
गुरूवार, 7 जुलै 2022 (21:13 IST)
केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा यशोत्सव म्हणून या योजनेचे लाभार्थी फेरिवाले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देशातील ७५शहरांमध्ये ‘स्वनिधीमहोत्सव’या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील चार शहारांचा यात समावेश आहे. येथील नॅशनल मिडिया सेंटरमध्ये केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी आज स्वनिधी महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा केली. मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी आणि अपर सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते.
 
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३३ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ७५ शहरांमध्ये ९ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार शहारांमध्ये या महोत्सवाचे आयोजन होणार असून सर्वप्रथम १४ जुलै रोजी नाशिक मध्ये ,१६ जुलै रोजी कल्‍याण डोंबिवली,२२ जुलै रोजी मुर्तिजापूर ( जि. अकोला ) आणि २४ जुलैला नागपूर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
या महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसह,डिजीटल घेवाण-देवाण विषयक प्रशिक्षण, ऋण मेळावा, फेरीवाले-रस्तयावरील विक्रेत्यांचा सत्कार, या विक्रेत्यांचे अनुभव कथन आणि या योजनेची माहिती व महत्व विषद करणारे नुक्कड नाटक यांचा समावेश असणार आहे.कोविड-१९ महामारीमध्ये देशातील फेरिवाले,रस्त्यावरील विक्रेत्यांसमोर उभ्या ठाकलेल्या संकटातून बाहेर काढून त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरु करता यावा, या उद्देशाने १ जून २०२० रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची देशभर सुरुवात झाली.

संबंधित माहिती

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments