Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता,साडे सहा लाखाचं नारळ

Webdunia
रविवार, 12 सप्टेंबर 2021 (15:21 IST)
आपल्याला एक नारळ विकत घेण्यासाठी जास्तीत जास्त 50 रुपये मोजावे लागू शकतात.पण एका माणसाने चक्क एक नारळाला विकत घेण्यासाठी तब्बल साडे सहा लाख रुपये मोजले आहे. कर्नाटकाच्या मंदिरातील ही घटना आहे.या मंदिरात नारळाची लिलाव करताना एका फळ विक्रेताने हे नारळ विकत घेतले.हे मंदिर आहे भगवान मलिंगरायाचे .हे महादेवाच्या वाहनाचे म्हणजे नंदीचे रूप मानले गेले आहे.या मंदिरात भाविक नारळ भेट म्हणून अर्पण करतात.नंतर देवाला अर्पण केलेल्या नारळाला आपल्या कडे ठेवल्याने भाग्यात वृद्धी होते आणि भरभराट होते.अशी आख्यायिका आहे.
 
दर वर्षी श्रावण महिन्यात शेवटी भाविकांनी अर्पण केलेल्या या नारळाचा लिलाव मंदिर समिती कडून केला जातो.हे नारळ खरेदी करण्यासाठी भाविक आणि फळ विक्रेते बोली लावतात. यंदाच्या वर्षीपण नारळाच्या लिलावासाठी 1 हजार पासून बोली लावली गेली.ती 3 लाखा पर्यंत गेली.मंदिर समितीने 3 लाख रुपयात हे नारळ देण्याचे निश्चित केले असता.एका फळ विक्रेताने दुपट्ट दाम देत साडेसहा लाखाचा हा नारळ विकत घेतला.हे देव नवसाला पावणारे आहे असे म्हटले जाते.फळ विक्रेता ने सांगितले की त्याला आर्थिक चणचण असताना आणि काही पारिवारिक त्रास असताना त्याने या देवाकडे साकडे घातले आणि त्याची भरभराट झाली.त्यामुळे त्याचा विश्वास आणि भक्ती देवावर असल्याने त्याने नारळासाठी एवढे पैसे मोजले.ते नारळ म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे आणि मी माझ्या देवघरात तो कायम ठेवणार असे त्यांनी सांगितले
मंदिर समितीने म्हटले आहे की लिलावाचे हे पैसे मंदिराच्या विकासासाठी आणि धार्मिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येतील.
 

संबंधित माहिती

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments