Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात तुम्ही काय दिवे लावले आहेत, त्याबद्दल सांगा : फडणवीस

Webdunia
मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (09:11 IST)
दिल्लीतील गोष्टींविषयी कशाला बोलता, महाराष्ट्रात तुम्ही काय दिवे लावले आहेत, त्याबद्दल सांगा, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणीची परिस्थिती असल्याचा आरोप केला. मराठा आंदोलकांना पोलीस घरात घुसून ताब्यात घेत आहेत, मारहाण करीत आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.
 
विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, अवेळी पाऊस, अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना देशद्रोही ठरविणे, हे आणीबाणीपेक्षाही भयंकर असल्याची टिप्पणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात वाईट परिस्थिती आहे. मराठा समाजाला आंदोलनही करून दिले जात नाही. महाराष्ट्राविषयी काही बोलले की सत्ताधारी उघडे पडतात. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलन किंवा अन्य विषयांवर बोलणे सुरू आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यांना कोणीही रोखलेले नाही. पण महाराष्ट्रात मात्र मराठा आंदोलकांना पोलीस ताब्यात घेऊन तुरुंगात डांबत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments