rashifal-2026

महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला, तापमानात वाढ

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (10:06 IST)
दिवसा निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे राज्यात सध्या दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.
 
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यात ताापानाचा पारा 30 अंशाच्या पुढे गेले आहे. यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, सांगली, परभणी, पुणे, जळगाव, अमरावती. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्रात 31 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमानाचा पारा समान अंशांवर आहे. कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. तर विदर्भात मात्र 24 फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
राज्यात गेल्या आठवड्यापासून रात्रीच्या किमान तापमानात वाढ सुरू झाली होती. हवामान विभागानुसार किमान तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांत 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 4 अंशांनी वाढले असून मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश भागात किमान तापमान 2 ते 4 अंशांनी वाढले आहे. 
 
मध्य महाराष्ट्रात 31 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. याच विभागात सोलापूर येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३४ अंशांवर आहे. कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. विदर्भात मात्र २४ फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरेंशी युती केल्यामुळे राज ठाकरे अडचणीत! अंधेरी पूर्वेतील शेकडो अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि एआयएमआयएमशी युती केल्यामुळे देवेंद्र फडणवीस संतप्त, इशारा दिला

जिंदमध्ये एका महिलेने 10 मुलींनंतर एका मुलाला जन्म दिला

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने युती केली

आधार पीव्हीसी कार्ड काढणे झाले महाग, किती पैसे द्यावे लागतील जाणून घ्या

पुढील लेख
Show comments