Dharma Sangrah

त्र्यंबकेश्वरमधील तणाव निवळला, एसआयटी चौकशीचे आदेश

Webdunia
मंगळवार, 16 मे 2023 (21:41 IST)
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 10 ते 12 जणांच्या जमावाने शनिवारी रात्री बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाला होता. या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. संबंधित युवकाला रविवारी सकाळीच नोटीस बजावण्यात  आली. पोलीस आणि मंदिर सुरक्षारक्षकांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळल्यावर तणाव निवळला. आता त्र्यंबकेश्वर शहर अथवा मंदिरात कोणताही तणाव नाही, असे पोलिसांनी सांगितले.
 
याआधी त्र्यंंबकेश्वर पुरोहित संघ ब्राह्मण महासंघ मराठा, महासंघ यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना निवेदन दिले आहे. दरम्यान  त्रंबकेश्वर पोलिसांनी दोन्ही समाजातील घटक तसेच शांतता समिती यांची बैठक घेतली. 
 
दुसरीकडे  या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची  चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात 
मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

कल्याणमध्ये पोलीस स्टेशनबाहेर सासरच्या मंडळींनी सुनेवर आणि तिच्या भावावर चाकूने हल्ला केला

IPL 2026 कोलकाता चेपॉकमध्ये चेन्नईचा सामना करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १५ एप्रिल रोजी नागपूरच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत घराबाहेरील कामे स्थगित, महाराष्ट्र सरकारने नवीन एसओपी जारी केली

महाराष्ट्र सरकारचा मोठा फर्मान; १ मे पासून मराठी नाही, परवाना नाही! टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी नवा नियम

पुढील लेख
Show comments